प्रतिनिधी । सोलापूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १०७८ गावांतील पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ऍग्री स्टॅक फार्मर आयडी नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऍग्री स्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रे आणि बँक शाखांमध्ये आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू असून ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. आधार प्रमाणीकरणासाठी कोणत्याही केंद्रावर कोणतेही शुल्क देऊ नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी केले आहे.