

प्रतिनिधी । सोलापूर
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर असलाघ्य भाषेत टीका करणाऱ्या शिवसेंना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर सोलापुरातील फौजदार चावडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी राऊत यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. ही फिर्याद दाखल केल्यानंतर मनीष केत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत यांच्यामुळे पक्ष संपला असून अशलाघ्य भाषेत टीका करण्याची त्यांची ही पद्धत अयोग्य आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मुंबई येथील पत्रकार परिषदेत राऊत यांनी तो कोण …. म्हणत अतिशय हीन दर्जा गाठत टिका केल्याने त्यांच्यावर आपण फिर्याद दाखल केली आहे. असेही यावेळी केत म्हणाले. या प्रसंगी ते बोलताना म्हणाले की समाजात माध्यमावर बोलताना काळजी घेतली पाहिजे कारण जनसामान्यावर तर याचा परिणाम होतोच पण पुढच्या पिढीवरही याचा नकळत परिणाम होतो त्यामुळे बोलताना आपण काय बोलतो आणि कोणाविषयी बोलतो याचं भान ठेवणे गरजेचे आहे आणि राऊत यांना ते भान देण्याच काम आपण या फिर्यादीच्या माध्यमातून करत आहोत.

